सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

दत्त जयंती निमित्त गिरगावकर महाराजांचे किर्तन


परतूर : (प्रतीनीधी)तालुक्यातील हरेराम नगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दत्त जयंती निमित्त दी१८-१२-२०२१ रोजी वार शनिवारी सकाळी १०:३० वाजता बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केले आहे. 
रामराव कणसे यांनी १९५८मध्ये हरेराम नगर येथील सुरु केलेल्या दत्त जयंती उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून आता पर्यंत अनेक मान्यवर किर्तनकरांनी या उत्सवात आपली कीर्तन सेवा दिली आहे. हरेराम नगर येथील कणसे कुटुंबीयांकडे या उत्सवाचे यजमान पद आहे. 
दत्त जयंतीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर कोरोना विषयक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणसे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत