लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

दत्त जयंती निमित्त गिरगावकर महाराजांचे किर्तन


परतूर : (प्रतीनीधी)तालुक्यातील हरेराम नगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दत्त जयंती निमित्त दी१८-१२-२०२१ रोजी वार शनिवारी सकाळी १०:३० वाजता बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केले आहे. 
रामराव कणसे यांनी १९५८मध्ये हरेराम नगर येथील सुरु केलेल्या दत्त जयंती उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून आता पर्यंत अनेक मान्यवर किर्तनकरांनी या उत्सवात आपली कीर्तन सेवा दिली आहे. हरेराम नगर येथील कणसे कुटुंबीयांकडे या उत्सवाचे यजमान पद आहे. 
दत्त जयंतीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर कोरोना विषयक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणसे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत