सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ कदम तर उपध्यक्षपदी शंकर उबाळे बिनविरोध

परतूर दि. प्रतिनिधी 
परतूर येथील जिल्हा परिषद कन्या  शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ कदम तर उपध्यक्षपदी शंकर उबाळे यांची बिनविरोध निवड. 
     शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शालेय शिक्षण समिती ची निवडणूक केंद्रप्रमुख नामदेव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 रोजी दुपारी 12 च्या सुमारास कन्या शाळेच्या कार्यालयात पार पडली या वेळी केंद्रीय मुखध्यापक विष्णुपंत ढवळे, सत्यनारायन सोमाणी,श्रीमती वाईकर,श्रीमती कीर्ती सैदाने सह शाळेतील सहकारी उपस्थित होते.
शालेय शिक्षण समिती च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पत्रकार योगेश बरीदे,बाळासाहेब चव्हाण,वैभव बागल,श्री माने आदींनी सत्कार केला.
फोटो- परतूर येथील शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना केंद्रप्रमुख नामदेव धुमाळ, पत्रकार योगेश बरीदे सह आदी दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत