सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त हेलस येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले


मंठा (सुभाष वायाळ। दि.09  मंठा तालुक्यातील हेलस या गावी सलग 3  वर्षापासून राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे या वर्षीही हेलस येथे सर्व कोरोनाचे नियम पाळून संभाजी ब्रिगेड हेलस शाखेच्या वतीने व श्री स्वामी समर्थ रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी 30  पेक्षाही अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले,  कार्येक्रमाचे अध्यक्ष म्हणून हेलस चे चेअरमन दिपक भाऊ खराबे यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्येक्रमास सुरुवात केली तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे सर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश घारे मंठा तालुकाध्यक्ष  बाळासाहेब खवणे व सर्व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्येकर्ते, जिजाऊ भक्त, गावकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत