सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुर मतदारसंघातील क्रिडा चळवळ जागृत ठेवण्यात कायमखानी सरांचा मोलाचा वाटा - मा.आ.सुरेशकुमार जेथलिया


परतुर - प्रतिनिधी(हनुमंत दवंडे )
गेल्या तिन तपा पासुन परतुर व परिसरात क्रिडा चळवळीचा वसा चालवत जागृत ठेवण्याचे मोलाचे कार्य सरफराज कायमखानी सर यांनी केले असल्याचे प्रतिपादन मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. जिल्हा परिषद शाळेचे क्रिडा शिक्षक सरफराज कायमखानी हे निवृत्त झाल्याने आयोजीत निरोप समांरंभात ते बोलत होते. जेथलिया यांच्या कार्यलयात सपन्न झालेल्या या सोहळयाला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, युवा नेते नितीनकुमार जेथलिया, काँग्रेस चे  तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, विलास झरेकर, इब्राहिम कायमखानी सह कार्यकर्त्यांची उपस्तीथी होती.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी कायमखानी यांच्या कार्याचे कौतुक करत म्हटले की, शैक्षणीक कांलखंडात सुरवातीपासुनचं क्रिडा क्षेत्राचा लळा असलेल्या कायमखानी सरांनी नौकरी करत असतांना देखील शाळे वितरीक्त ईतर कुठेही क्रिडा स्पर्धो असल्यास हेरारीने सहभाग नोंदवत त्या स्पर्धो यषस्वी देखील करूण दाखवल्या , त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे .या व्यतिरिक्त परतुर सराख्या ठिकाणी राज्य स्तरीय स्पर्धो घेत त्यांनी ग्रामीण खेळाडुना एक प्रकारे न्याय देण्याच प्रामाणीक प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. त्याचे सर्वच राजकीय पक्ष असो वा सामाजीक संघटना याच्या सोबत स्नेहाचे संबध असुन भविष्यात निवृत्ती जिवनात त्यांनी क्रिडा चळवळ चालु ठेवत राजकीय क्षेत्रातही प्रवेश करावा,असा सल्ला यावेळी जेथलिया यांनी कायमखानी यांना दिला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत