सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

आपला देश लवकरच कोरोना मुक्त होईल. तहसिलदार रुपा चित्रक.

  परतुर (हनूमंत दंवडे)संपुर्ण जगात थैमान घालणार्या कोरोना या आजारातुन आपला देश लवकरच मुक्त होईल असा आशावाद परतुरच्या तहसिलदार रुपा चित्रक यांनी व्यक्त केला. आपल्या देशातील लोकसंख्येची घनता व लोकसंख्या मोठी असुनही सामाजिक अंतर व प्रभावीपणे राबण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम या मुळे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले .

पाटोदा[माव] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील पंधरा ते अठरा या वयोगटातील  विद्यार्थ्यांच्या लसिकरण कार्यक्रमाचे ऊद्घाटण प्रसंगी त्या बोलत होत्या. शिक्षक - पालक - संस्थाचालक यांच्या सहकार्यातुन या वयोगटातील संपुर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण आपण पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
    या कार्यक्रमाची सुरूवात भारत मातेची प्रतीमा पुजन करुन झाली. 
कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी नेहा पुजरवाड यांनी लसीकरणाबाबत अनेक शंकाचे निरसन करुन लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले .कोणतीही शंका मनात न बाळगता पालकांनी आपल्या पाल्यास लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान आज रोजी वर्ग नववी व दहावी मधील श्याहाशि [86] विद्यार्थ्यांना कोव्हॕक्सीन ही लस देण्यात आली.

कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे ऊपाध्यक्ष तुळशिदासजी खवल ,आरोग्य रक्षक आर.आर. तोटे, जी.बी.बुधवंत , आरोग्य सेवक पि.एम.प्रधान ,आरोग्य सेविका श्रीमती एल.एस.वैद्य,मंडळाधीकारी शरद कुळकर्णी,कृष्णाजी सोनवने ,पालक प्रतिनीधी दिनेश खवल, छबुराव मुंढे,बालासाहेब नखाते,भिमराव शिंदे,सदाशीव खवल,मुख्याध्यापक अंभोरे सर आदी पस्थीत होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी तर  सुत्र संचालन चत्रभुज खवल यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.
     

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत