सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भव्य लसीकरण संपन्न



(सुभाष वायाळ )29 मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कोरोना लसीकरण ठेवण्यात आले होते. या लसीकरणात वयोगट 15 ते 18 वयोगटातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले केंद्र सरकारच्या 15 ते 18 वयोगटातील लसीकरण मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 296 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले या लसीकरणासाठी ,डॉ.स्वाती संजय पवार आरोग्य अधिकारी,प्रियंका असोले आरोग्य सेविका,विलास देशमुख आरोग्य सहाय्यक,वसंत गायकवाड आरोग्य सहाय्यक, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
सुधाकर जाधव, उपप्राचार्य संभाजी तिडके व सर्व प्राध्यापक, आदी जणांनी परिश्रम घेऊन जास्तीत जास्त लसीकरण करून घेतले यावेळी आरोग्य विभाग, विद्यार्थी, प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत