सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पत्रकार भारत सवने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार


परतूर (हनूमंत दंवडे)

येथील पत्रकार भारत सवने यांना प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या वतीने स्व. श्रीकृष्ण भारुका स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार संघ पदाधिकारी आणि महावितरनाच्या कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 परतूर तालुक्यात भारत सवने यांनी २००९ पासून पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करून गेल्या बारा वर्षापासून पत्रकारिता पदवी घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपल्या पत्रकरीतेतून प्रश्नांना निर्भीड वाचा फोडत सातत्याने न्याय देण्याची भूमिका बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपले योगदान देत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपला ठसा निर्माण केला आहे. याची दखल घेऊन त्यांना परतूर तालुक्यात प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या पहिला उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या झाल्याबद्दल पत्रकार संघटना, महावितरण, पोलिस, राजकीय, सामाजिक संघटना कडून सत्कार करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत