सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

उद्धव ठाकरेंचा शाळा सुरू करण्याला हिरवा कंदील, सोमवारपासून सुरू होणार शाळा========


प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
सोमवार पासून सुरु होणार शाळा
मुंबई आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनची तिसरी लाट डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पसरण्यास सुरूवात झाली. कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्धव ठाकरे सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिलीये," येत्या 24 जानेवारीपासून महाराष्ट्रातील प्री-प्रायमरी ते बारावी शाळा सुरू होतील.

कोरोना संसर्ग पसरल्यापासून राज्य सरकारने पहिल्यांदाच प्री-प्रायमरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

त्या पुढे सांगतात, "प्रत्येक भागातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत." एका महापालिलेने निर्णय घेतला म्हणजे सर्वांनी तो फॉलो करावा असं नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.
शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने याआधीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना पुन्हा शाळा सुरू करताना कायम असतील.

शिक्षणमंत्री पुढे म्हणाल्या, "मुलांना शाळेत येण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. कोणाचंही शिक्षण थांबू नये ही आमची भूमिका आहे."

बुधवारी शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता.

लहान मुलांच्या टास्कफोर्सनेही शाळा सुरू कराव्यात याबाबत हिरवा कंदिल राज्य सरकारला दिला होता.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, "सुरक्षेचे सर्व उपाय करूनच शाळा पुन्हा सुरू केल्या जातील."

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत