सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मुलाच्या जन्मदिनाचा खर्च टाळून एस टी कामगारांना राशन वाटप...

परतूर /हनुमंत दवंडे 
एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरणासाठी तसेच आर्थिक विवंचनेला कंटाळून ८३ कर्मचाऱ्यांनी आत्मत्याग केला. त्यांच्या दुःखात सामील होऊन गेल्या तीन महिन्यापासून त्यांचा दुखवटा पाळून परतुर आगारातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाचा लढा लढत आहेत. परंतु महामंडळाने गेल्या तीन महिन्यापासून कामगारांना पगार न दिल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांच्या मनात नाना प्रकारचे विचार येत आहेत त्याची जाण ठेऊन माझ्याकडून काही मदत करता येईल का या उद्देशाने तसेच भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि माजी पाणी पुरवठा मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस तथा दैठना खुर्द चे सरपंच संपत दादा टकले यांनी त्यांचा मुलगा शंभूराजे यांचा जन्मदिन साधेपणाने साजरा करून व्यर्थ खर्च टाळून एसटी कामगारांना एका महिन्याचे राशन वाटप केले. माननीय आमदार बबनरावजी लोणीकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या  भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा सरचिटणीस तसेच दैठणा खुर्द चे सरपंच संपत दादा टकले यांनी सर्वच गरजू एसटी कर्मचाऱ्यांना वाटप केले.
त्यांच्या या स्तुत्य विचारातून परतुर आगारातील गरजू कामगारांना राशन दिले बद्दल गणेश कानडे, कल्याण सोळंके, भुजंग माकोडे, मुकुंद भालेराव, राजबिंडे तसेच इतर सर्वच एसटी कामगारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले...

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत