सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मंठा पोलीस ठाणे येथे विद्यार्थ्यांने जाणून घेतले पोलीस कामकाज



 मंठा प्रतिनिधी /सुभाष वायळ
       दि.21 तालुक्यातील पांगरी गोसावी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच मंठा पोलीस स्टेशनला भेट दिली.यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना पो.नि.देशमुख यांनी केले.या भेटीत विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज कशाप्रकारे चालते याविषयीची माहिती घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख,पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष रणजित बोराडे,मुख्याध्यापक के.के. भांडवलकर,फौजदार बलभीम राऊत,आसमान शिंदे यांची उपस्थिती होती.
     या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गुन्हा कसा दाखल होतो, ठाणे अंमलदाराचे कार्य, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग कसा केला जातो, समाजामध्ये शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस कशाप्रकारे काम करतात आदीबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करावा याविषयी देखील माहिती दिली.मोबाईल वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी देखील सांगितले. महिला पोलीस कर्मचारी सविता फुलमाळी यांनी मुलींना न घाबरता अन्याय विरोधात तक्रार देण्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.यावेळी शंकर राजाळे,दीपक आढे,प्रशांत काळे,विजय तांगडे, विशाल खेडकर,संतोष बनकर,गायके,आनंद ढवळे,दिपक ढवळे, संदीप राठोड, पांडुरंग हागवणे,कानबाराव हराळ, मांगीलाल राठोड,शिक्षिका एस.एस.पोले,शिक्षक आर.डी.सुरनार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Show quoted text

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत