सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

राजेश (भैय्या)टोपे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर -शिवाजी भालेकर (राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष)


परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे यंदाचे गोदावरी गौरव पुरस्कार आज जाहीर झाले. यंदा कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावताना केलेल्या लोकसेवेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता अतुल पेठे, विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉ. हेमचंद्र प्रधान, चित्रकला क्षेत्रातल्या योगदाना बद्दल डॉ. सुधीर पटवर्धन, प्रख्यात तबला वादक पं. सुरेश तळवळकर आणि अदम्य साहस दाखवल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातल्या सीताबाई काळु घारे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
सीताबाई घारे यांनी बिबट्याशी झुंज दिली हेाती. प्रतिष्ठानचे विश्वस्त हेमंत टकले आणि कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. २१ हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं  स्वरूप आहे. येत्या १० मार्च रोजी नाशिक मध्ये या पुरस्कारांचं  वितरण होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं १९९२ सालापासून विविध क्षेत्रातल्या येागदानाबद्दल एक वर्षा आड हे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शिवाजी भालेकर व राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनीं आमदार राजेश भैय्या टोपे साहेब यांचा सत्कार केला या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भालेकर, नाजेर कुरेशी ,   बालासाहेब ढेरे ,  एन. खरात , शिवाजी डोळझाके ,  खलेक कुरेशी , रामेश्वर ढेरे, अंबादास वढे, विवेक ढोके, महेश भालेकर , ज्ञानराज भालेकर, राजवीर भालेकर , रामभाऊ भालेकर आदी मंडळीकडून सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत