सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रत्येक जिल्ह्यात ‘एमआरआय’; तालुक्यांत ‘सीटी स्कॅन’, ‘डायलिसिस’’_राजेश टोपे (आरोग्यमंत्री तथा कुटुंबकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य)

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एमआरआय स्कॅनिंग, तर 50 ते 100 खाटांपर्यंतच्या तालुकास्तरावरील सर्वच उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रांना सीटी स्कॅन आणि डायलिसिससह सोनोग्राफीची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. बाह्य यंत्रणेकडून दिल्या जाणार्‍या या सुविधांची निविदा काढली आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत प्रत्यक्ष या सुविधा उपलब्ध होतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

आरोग्यसेवेकडे अनेक वर्षे दुर्लक्षच झालेले आहे, असे सांगत टोपे म्हणाले, सरकार कोणाचेही असो, आरोग्यावर आवश्यक निधी खर्च झालेला नाही. किमान पाच टक्के निधी खर्च व्हावा, असे आयोगाकडून वारंवार सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र एक टक्‍काही खर्च होत नव्हता. कोरोनामुळे आता परिस्थिती ब

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत