सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

डाँ .गोपाल तुपकर यांना सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार जाहीर


 मंठा-प्रतिनिधी /सुभाष वायाळ
      दि.22 मराठी साहित्य मंडळ तर्फे साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्याला दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार यावर्षी मंठा येथील डॉ.गोपाळ विठोबा तुपकर यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ.गोपाल तुपकर यांचे अंतरीचे शब्दफुले हा काव्यसंग्रह व इतर अनेक काव्य व लेख प्रसिद्ध झालेले आहेत.साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार त्यांना वितरण केला जाणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर राष्ट्रीय अध्यक्ष मराठी साहित्य मंडळाचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवड झाल्याचे कळवले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे प्रा.सतीश वैद्य, संजय भवर, मुरलीधर बोराडे, सुभाष वायाळ, भीमाशंकर तुपकर, व शैक्षणिक क्षेत्रातील आणि साहित्य क्षेत्रातील सर्वाकडून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत