सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी शेख अब्‍दुल रहीम. एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र...

परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
 ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल परतूर या माध्यमिक विद्यालयात ज्युनियर के. जी. ते इ 10 वी पर्येंत शिक्षण घेतलेल्या शेख अब्दुल रहीम हुसेन* यांनी नीट परीक्षेत 566 गुण घेत शासकीय मेडिकल कॉलेज , गोंदिया येथे (MBBS)* साठी प्रवेश मिळाल्याबद्दल ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल, परतूर येथे शेख अब्दुल रहीम व त्यांचे बंधू श्री अब्दुल्ला सर* यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रहीम ला ब्राईट स्टार ची Academic excellence ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री खणके सर,शेख सर, राम सर, कुकडे सर, सय्यद सर,अंभुरे मॅडम,सकलेचा मॅडम, गिरी मॅडम हे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.शेख अब्दुल राहिम ने हे यश संपादन केल्याबद्दल श्री राजबिंडे सर, श्री शब्बीर सर , श्री  भालेराव सर  शाळेचे मुख्याध्यापक श्री खणके सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत