सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परभणी महानगर भाजपने केली नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी...

परभणी प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना काल ED नी अटक केली त्यांच्यावर 1993 साली झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम यांच्या जमीन देवाण घेवाण प्रकरण मध्ये नवाब मलिक यांचे हात असून त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडी दिली आहे या प्रकरणी आज परभणी भाजपा महानगरच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नवाब मलिक यांचा मंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा व त्यांच्या वर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.
यावेळी एन. डी. देशमुख,संजय रिझवानी, अतिक पटेल, दिनेश नरवाडकर, कमलकिशोर अग्रवाल,प्रदीप तांदळे,शकुंतला मठपती,छाया मोगले,विजया कातकडे,विजय गायकवाड,संजय कुलकर्णी,संतोष जाधव,रामदास पवार, अनंता गिरी, संदीप शिंदे, दीपक शिंदे, नीरज बुचाले, माऊली कोपरे व मोहम्मद गौस आदीच्या स्वाक्षरी आहेत....

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत