सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न...


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक परतूर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोरणा संदर्भामध्ये शिवजयंतीच्या उत्सव साजरा करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये शिवभक्त शिवज्योत घेऊन जाण्यासाठी 200 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे तसेच पाचशे लोकांनी एकत्र येऊन शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा असे दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे याच अनुषंगाने परतूर पोलीस स्टेशन येथे समता, बंधुता, न्याय, या मूलभूत हक्क याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि शांततेत शिवजयंती उत्सव आपण साजरी करावी .असे परतूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कौठाळे  यांनी शांतता बैठकीमध्ये सांगितले .या शांतता बैठकीला उपस्थित म्हणून रमेश  सोळंके राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष परतूर, अशोक रावआघाव शिवसेना तालुकाध्यक्ष परतुर ,बाबाजी गाडगे काँग्रेस तालुकाध्यक्ष, संदीप दादा बाहेकर, रमेश भापकर तालुका अध्यक्ष भाजपा ,शत्रुघन कणसे पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा ,राहिमोदिन कुरेशी, प्रकाश चव्हाण नगरसेवक, कृष्णा आरगडे, नगरसेवक प्रवीण  सातोनकर  , लक्ष्मण बीलारे कृष्णा सोळंके महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष ,परतुर विदुर जईद, योगेश गाते, व पत्रकार बंधु, उत्सव समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत