सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

छत्रपती संभाजी राजे यांच्या अमरण उपोषणाला मंठा मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा


 मंठा प्रतिनिधी सुभाष वायळ /पप्पू घनवट 
दि.२८ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने अनेक जणांनी वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत. तरीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसून हा प्रश्न सतत प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये विविध मराठा सामाजिक संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.
       आता यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या सुद्धा पूर्ण व्हाव्यात यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषणाला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्य व तेथील जनतादेखील पाठिंबा दर्शवित आहे. या आमरण उपोषणाला मंठा तालुक्यातील मराठा समाजाच्या विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.या पाठिंब्याची निवेदन मंठा तहसीलदार व मंठा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ,शिवाजीराव जाधव, एकनाथराव काकडे, शिवाजीराव देशमुख, वैजनाथराव मोरे दिगंबर बोराडे, कुलदीप बोराडे, सचिन बोराडे, शत्रुघन तळेकर, शरद बाहेकर, आदि जणाच्या स्वाक्षर्‍या आहेत व या वेळी आदी जण उपस्थित होते.

 चौकट
 छत्रपती संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणाची शासनाने वेळीच दखल घेतली नाही व मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब केल्यास मराठा सेवा संघाच्या नेतृत्वाखाली मंठा येथे उपोषण करण्यात येणार आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घ्यावी. व समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात.
- ता.अध्यक्ष मराठा सेवा संघ
 ज्ञानेश्वर वायाळ

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत