सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सभापती कपिल आकात यांच्याकडून आर्थिक मदत

परतूर – प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 
तालुक्यातील दैठना खुर्द येथे घराला आग लागून नुकसान झाल्याने राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपिल आकात यांनी भेट घेऊन पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत केली आहे.
दत्ता विष्णु सवने यांचे घरी त्याची आईने गॅस पेटवूला असता गॅसचा भडका झाल्याने घरातील संस्कार उपयोगी साहित्य व नगदी रोख रक्कम जाळून खाक झाल्याची घटना दि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली होती.
अग्निशामक व गावकर्‍यांनी आग आटोक्यात आणली. गॅस टाकीचा विस्फोट न झाल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत घरासह घरातील एक किंट्टल गहू, ज्वारी, किराणा, कपाट, कपडे, लोखंडी टीन पत्रे, व नगदी रोख रक्कम दोन लाख तीन हजार रुपये जाळून खाक झाले. या आगीत अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाले होते. राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपिल आकात यांनी दि १ मार्च २०२२ रोजी कुटुंबियांची भेट घेऊन पंचवीस हजार रुपयाचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. यावेळी बंडेराव सवने, अनिकेत नवल,सरपंच सोनाजी गाडेकर, ओमकर काटे, अंकुश शिंदे, मोहन बाण, वसंत सवने, सुरेश सवने, हरिभाऊ सवने, महादेव सवने, सुनील तायडे, दीपक सवने, दौलत सवने, संजय सवने, तातेराव सवने, दत्ता सवने, बाळासाहेब ताठे, अमोल सवने, विकास सवने, प्रयागबाई सवने यांच्यासह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.   

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत