सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुर शहरासह ग्रामीण भागात विनाल्या जात आहे अंधश्रद्धा चे जाळे.....

परतुर दि 02 प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतूर शहरासह ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा चे जाळे विणले जात असून यामध्ये सुजाण नागरिकांसह सुशिक्षित नागरिक बळी पडत आहे तर यातून बुवाबाजी करणारी मोठी आर्थिक लूट करताना दिसत आहे.
       भारत देश 21 व्या शतकात विज्ञाननाच्या दृष्टिकोन समोर ठेऊन मोठी प्रगती करताना दिसत आहे तर एकीकडे अनेक सुशक्षित नागरिक अंधश्रध्दा चा सहारा घेत जीवन जगताना दिसत आहे. अशीच काही परिस्थिती परतूर शहरात परिसरात निर्माण झाली आहे बुबाजी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीत अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी देखिल आहेत. महिन्यातील अमावस्या किंवा पौर्णिमेला कुठंतरी एखाद्या मंदिरा जवळ अंधश्रद्धा वर विश्वास ठेवणारे नागरिक बोलून त्यांचे सकून पाहणे,भानामती,चेतूक, काळी भावली जाळणे, बिबे येणे आशा आजाराची भीती दाखवून खुलेआम पैसे लुटणे चालू आहे. मागील काही वर्षा पूर्वी अंधश्रद्धा निर्मोलन समितीच्या पदाधिकारी एकनाथ कदम,रमाकांत बरीदे, लक्ष्मीकांत माने, कल्याण बागल यांनी आनंदवाडी येथील एका भोंदूबाबा ला सापळा रचून पकडले होते व पोलिसांच्या स्वाधीन केले होते.पन या प्रकारानंतर अनेक दिवस या प्रकारांना आळा बसला होता पण मागील काही दिवसांपासून पुन्हा तोंड वर काढताना दिसत आहे.सध्या शहरात दर रविवारी हा प्रकार इतका उघडपणे चालू आहे की याला कोण रोख लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे गोरगरीब जनतेची मोठी आर्थिक लूट होऊन ते अंधश्रद्धा चे बळी पडत आहे.
    परतूर शहरात व ग्रामीण भागात असा प्रकार जर कुठे चालू असेल तर नागरिकांनी न घाबरता पोलिसांना संपर्क करावा आशा भोंदूबाबा बाबा चा शोध घेऊन लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
श्यामसुंदर कौठाळे
पोलीस निरीक्षक
आयुष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सहज सोडवणूक झाली नाही तर मनुष्य अंधश्रद्धा च्या आहारी जातो व त्याचाच भोंदूबाबा गैरफायदा घेतात त्यामुळे प्रत्येकाला कार्यकारण समजण्याची वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे.
एकनाथ कदम 
राज्य कार्यकारणी सदस्य
अंधश्रद्धा निर्मोलन समिती सदस्य

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत