सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सोपान गणपतराव चव्हाण यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती



 मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ 
दि.१७ तालुक्यातील खोराड सावंगी येथील, महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात गेल्या ३२ वर्षांपासून जालना जिल्ह्यात कार्यरत असलेले सोपान गणपतराव चव्हाण यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली.त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय जालना,परतुर,टेभुर्णी,जाफ्राबाद,सेवली, आष्टी,मंठा ह्या सर्व पोलीस स्टेशनवर कार्यरत असतांना त्यांनी आतिशय कर्तव्यदक्षपणे कामे केली आहे.सोपान चव्हाण एक शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनत करून जालना जिल्ह्यात १९९१ साली पोलीस भरती झाले आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक,सहायक पोलीस निरीक्षक यांचे सन २००० ते २०२१ पर्यंत रायटर [ मुन्सी ] म्हणून काम पाहिले आहे. सोपान चव्हाण यांचा सामाजिक चळवळीचाही फार मोठा सहभाग असतो. 
माननीय पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पदोन्नती दिल्याने माननीय पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सोपान चव्हाण यांना स्टार लावले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी पोलिस उपनिरीक्षक आसमान शिंदे बलभीम राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण आढे, पो.हे.कॉ.उत्तम राठोड, हे.कॉ.बंनकर,मांगीलाल राठोड,विजय जुमडे,आनंद ढवळे,मदने,बाळू राठोड इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत