सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

इमर्जन्सी लोडशेडिंग च्या नावाखाली जनतेचा छळ वीजवितरणने थांबवावा-संपत टकले,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण ला भाजपाचे निवेदन

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली वीज वितरण कंपनीने जनतेचा छळ चालवला असून रात्री-बेरात्री केव्हाही लाईट घालवण्याचे पाप वीज वितरण करीत असून श्रीष्टी सर्कल मध्ये एक दिवस आड विद्युत पुरवठा केला जात असल्याने नागरिकांसह शेतकरी हवालदिल झाला असून बागायती क्षेत्राला या वीज वितरण च्या गलथान कारभाराचा फटका बसत असल्याचे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले संपत टकले यांनी म्हटले आहे
आज भाजपा च्या वतीने इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली चालवलेला सावळागोंधळ थांबवावा यासाठी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले यावेळी ते बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा छळ न थांबवल्यास आमचे सर्वोच्च नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संपत टकले यांनी यावेळी वीज वितरण ला दिला
पुढे बोलताना संपत टकले म्हणाले की राज्यातील आघाडी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे पाप करू नये उन्हाळ्याच्या दिवसात इमर्जन्सी च्या नावाखाली दोन दोन दिवस वीज गायब असते अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसून अनेकांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही आबालवृद्ध यांना रात्रीच्या गर्मीचा त्रास सहन होत नाही अशा परिस्थितीत वीज वितरण तुघलकी भूमिका घेत असून यामुळे सर्वसामान्य जनता छळली जात असल्याचा आरोप या वेळी टकले यांनी केला
या वेळी यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे दया काटे ओमप्रकाश मोर श्रीरंगराव जईद दिनेश शेठ होलानी नगरसेवक संदीप बाहेकर नगरसेवक प्रकाश चव्हाण नगरसेवक कृष्णा आरगडे राजेंद्र मुंदडा जगन्नाथ सोनखेडकर, शिवाजी बल्लमखाणे बळीराम हिवाळे प्रमोद राठोड मुज्जू कायमखानी मलिक कुरेशी नंदकिशोर मुंदडा आनंद कोटेचा जगदीश झंवर ओमप्रकाश राठी श्यामसुंदर चितोडा नरेश कांबळे राजेश म्हस्के अमर बगडीया संतोष काळे अमोल हरजुळे, भास्कर काळे दीपक कुरे विष्णू मचाले लालचंद मालपाणी सौरभ बागडीया यांच्यासह शेकडो कार्यकर्यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत