सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

हेलस येथे श्रीराम मंदिर कलश रोहण सोहळा उत्साहात संपन्न



मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ 
     -दि..०८तालुक्यातील हेलस गावाची एक अनोखी ओळख आहे येथील पुरातन हेमाडपंथी व प्राचीन कलाकृती असलेले महादेव मंदिर, कालिंका देवी मंदिर, गणपती मंदिर व तसेच श्री दत्त मंदिर या सर्व मंदिरांची बांधकाम आणि कलाकृती बघून मन हरकून जाते तसेच हेलस या गावातील सर्व गावकरी आपली संस्कृती जपत दरवर्षी श्री गणेश उत्सव साजरा करतात गेल्या कित्येक वर्षांपासून चालत असलेलं एक गाव एक गणपती ही परंपरा अजूनही या गावात शांततेत पार पडत असते गावाच्या परिसरात बारा हनुमान मंदिरे असून प्राचीन वास्तू, परंपरा, धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवा साठी ओळखले जाणारे हे गाव आहे तसेच या गावाच्या बाहेर उत्तरेला काही अंतरावर बऱ्याच वर्षांपूर्वी एक महिला शेतात जात असतांना तिला जमिनीतून काहीतरी आवाज आल्याचं जाणवलं त्यानंतर त्या महिलेने तिथे खोदल असता जमिनीच्या आतून श्रीराम, लक्ष्मण, आणि सीता या तीन मूर्ती आढळून आल्या असे गावातील लोक सांगतात तेव्हा पासून गावाकऱ्यांनी एक छोटं मंदिर बांधून तिथे श्रीरामाच्या मंदिराची स्थापना केली होती पण काळानुसार ते मंदिर खूप जुनं झाल्यामुळे गावाकऱ्यांनी नवीन व भव्य असे श्रीरामाचंद्र प्रभूचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले काही वर्षापासून चालत असलेल्या ५१ फूट उंची असेलेलं मंदिर बांधून पूर्ण झाले व दि.७/४/२०२२ गुरुवार रोजी या मंदिराचा भव्य कलश रोहणाचा व श्री राम,लक्ष्मण, सीता आणि हनुमानच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाचा कार्येक्रम पार पडला या कर्यक्रमाच्या निमित्ताने गावातून मूर्तिची भव्य मिरवणूक काढली व नंतर श्रीरामाच्या मंदिरापाशी महापूजा करून मंदिरावर कळस लावण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी गावातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक फक्त उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत