सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

राज्य शासनाकडून धनगर समाजावर अन्याय- हनुमंत दवंडे मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष


जालना प्रतिनिधी/समाधान खरात
 महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विविध विकास महामंडळासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रात दोन नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला वगळण्यात आले आहे. मेंढ पाळा साठी असणारे अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास कसलाही निधी दिला नाही.
             यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजावर अन्याय करण्यात आला आहे. असा आरोप मौर्य क्रांती संघाचे तालुका अध्यक्ष हनुमंत द वंडे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील महामंडळांना भरीव निधी देण्याचा ठराव करण्यात आला असून त्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ 500 कोटी, वरून 1000 कोटी ,संत रोहीदास उद्योग व चर्मकार विकास महामंडळ 73 कोटी वरून 1000 कोटी,धनगर समाज हा दोननंबर वर असलेला व अति मागास असलेल्या धनगर समाजाला यातून वगळण्यात आले आहे. धनगर समाजाची गेली कित्येक वर्षापासून एसटी आरक्षण देण्याबाबतची मागणी सर्वच राजकीय पक्षानी कायमस्वरूपी बाजूला ठेवली आहे. धनगर समाजावर अन्याय करत आहात मेंढपाळ वरती दररोज अन्याय होत असून साधी त्यांची दखल घेतली जात नाही .डोंगरी भागात राहणाऱ्या समाज बांधवांना सातत्याने वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागत असते. धनगर समाजाला का या सर्व च प्रक्रियेतून जाणून-बुजून वंचित ठेवण्यात आले. धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवायचा वापरा आणि फेका आणि हीच नीती सर्वच राजकीय पक्षाची दिसून येतं आहे. महाराष्ट्रातील सर्व मंत्री आमदार खासदार यांनी धनगर समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मौर्य क्रांती संघाचे परतुर तालुका अध्यक्ष हनुमंत दवंडे म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत