सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार

परतूर –प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शहरात महावितरणमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर प्रकाशराव भामट यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार दि १ मे कामगार दिनी औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर प्रकाशराव भामट यांनी महावितरणाच्या परिमंडळात काम करीत असतांना सण २०२१-२२ मध्ये अविरत विनाअपघात सुरळीत वीजसेवा, रोहित्राची काळजी, अचानक उदभवणार्‍या तांत्रिक समस्येचे त्वरित निराकरण करणे, कामाच्या ठिकाणची देखभाल, इत्यादि क्षेत्रात कर्तव्य दक्षता, निष्ठा व श्रम दाखवून केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत