सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्मोत्सव प्रत्येक गावागावात साजरा करणार-प्रकाश सोनसळे(धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य तथा सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना)

 
बीड प्रतिनिधी
आज बीड येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
  या अभिवादन सभेचे आयोजक मा. प्रकाश  सोनसळे हे अनेक दिवसापासून एक समाजाला नवी दिशा देण्यासाठी हा उपक्रम चालवत आहेत.
  आज बीड येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्यास अभिवादन डॉ.योगे साहेब यांच्या शुभहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर राजे यशवंतराव होळकर प्रतिमापूजन माननीय श्री शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व मल्हाराव होळकर यांच्या प्रतिमेचेपूज मा.श्री.बाबासाहेब लंबाटे अण्णा यांच्या हस्ते करण्यात आले.
   यावेळी प्रकाश  सोनसळे यांनी बोलताना सांगितले की या वर्षी अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव प्रत्येकाने आपापल्या गावात साजरा करण्यात यावा यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करुया असे सांगितले.
    यावेळी लिंबाजी महानोर साहेब, प्रकाश बुधनर, अमर वाघमोडे ,सतीश लंबाटे, सुधाकर वैद्य ,शीतल मतकर, कोळेकर मनोज, आदी समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत