सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

राज्यसभा निवडणुकीचा निकाल महा विकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी..

 प्रतिनिधी हनुमंत दवंडे
         राज्यसभा निवडणुकीचा नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शनिवारी पहाटे निकाल आला. राज्यातील सहा जागांपैकी भाजपला अनुक्रमे तीन शिवसेना, काँग्रेस ,आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा जिंकली तत्पूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दिवसभराच्या गदारोळानंतर संध्याकाळी मतमोजणी थांबवण्यात आली होती .भाजप आणि महा विकास आघाडीने एकमेकांच्या मतदार आमदारावर आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत बैठक घेतली तब्बल साडे आठ तास मतमोजणी रखडली होती. बैठकीनंतर आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले त्यानंतर मतमोजणी सुरुवात करण्याचे निर्देश दिले होते. मतमोजणी अखेर भाजपचे तीन उमेदवार तर महा विकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
माविआचे तीन उमेदवार तर भाजपची तीन उमेदवार जिंकले पहिल्या पसंतीच्या मतमोजणी मध्ये महा विकास आघाडीचे तीन उमेदवार भाजपचे उमेदवार तीन विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत .त्याचबरोबर भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजय झाले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या समजल्या गेलेली सहावी जागा धनंजय महाडिक यांनी संख्याबळ यापेक्षा अधिक मतांनी जिंकली महाडिक कुटुंबांनी गुलालाची उधळण केली. कोणाला मिळाली किती मते इम्रान प्रतापगडी-44, प्रफुल्ल पटेल -43,संजय राऊत-41, अनिल बोंडे- 48,पियुष गोयल-47, संजय पवार- 33,धनंजय महाडिक-42 महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैद्य ठरवले आहे दोन मतावर आम्ही आक्षेप घेतला होता मात्र कारवाई झाली नाही आयोगाने त्यांची बाजू मांडली.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत