सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जालना पोलीस अधीक्षक पदी अक्षय शिंदे यांची वर्णी..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
जालना पोलिस अधीक्षक पदासाठी गेल्या दीड महिन्यापासून रस्सीखेच सुरू होती. ८ जून रोजी गृह विभागाने आदेश आहेत . अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख , एसपी हर्ष पोद्दार , एसपी आर . रागसुधा यांच्याकडे काही दिवस जिल्ह्याचा पदभार होता. दरम्यान , बुधवारी गृह विभागाने अक्षय शिंदे यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याचे काढले असून आदेश जारी केले आहेत. पोलिस अधीक्षकपदी अक्षय शिंदे यांची वर्णी लागली आहे.
निवडणुका असल्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार व आहे . गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोऱ्या – घरफोड्या क लूटमारीचे प्रमाणही वाढले आहे. मागील दीड महिन्यापासून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जालन्याचा पदभार दिला गेला होता . अक्षय शिंदे यांचे नाव पहिल्यापासूनच चर्चेत होते. बुधवारी याबाबत आदेश निघाले वाढती गुन्हेगारी रोखण्याचेही मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे आता शहरवासीयांचे याकडे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत