अन्सारी इफत फातेमाचे बारावीच्या परीक्षेत यश
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते कुणीही घेतले तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणतात. यामुळे आता अनेकजण शिक्षणावर भर देतात. आपण नाही शिकलो तर आपली मुलं शिकायला पाहिजे, अशीही धारण आता ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा रुजू लागली आहे. त्यामुळे शिक्षण किती महत्वाचे आहे, हे लक्षात येत. हेच महत्व लक्षात घेत शहरातील वृत्तपत्र घरोघरी वाटप करणारे रईस अन्सारी यांची मुलगी अन्सारी इफत फातेमा हिने बारावीच्या प्रथमश्रेणीत येत 86.00 टक्के मार्क घेऊन यश मिळवले आहे
या यशाबद्दल इफत फातेमा हिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment