सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना परतुरयांच्या वतीने सामाजिक वनी करण विभाग कार्यालय परतुर यांना निवेदन सादर.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
प्रहार क्रांती आंदोलन संघटना प्रतुर यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभाग परतूर यांना निवेदन देण्यात आले .दिलेल्या निवेदनामध्ये
सामाजिक वनीकरण कार्यालय मार्फत सन 2019 ते 2022 पर्यतची शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजने अंतर्गत तीन वर्षात परतुर तालुक्यातील एकूण बजेट किती शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहे व किती फाईल मंजूर करण्यात आलेल्या आहेत यांची सविस्तर माहिती देण्यात यावी.
परतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण कार्यालयामार्फत बांधावरील झाडे लावणे ही महाराष्ट्र शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची शेतकऱ्यांच्या मजुरांची यादी व शेतकऱ्यांची कागदपत्राची वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी .व सण 2019 ते 2022 पर्यंतच्या शासनाचे बजेट कोण कोणत्या स्वरूपात वाटण्यात आले. त्याची माहिती लेखी स्वरूपात शासन नियमाप्रमाणे माहिती देण्यात यावी.
2019 ते 2022 पर्यंतचे रोडच्या साईडने झाडे लावण्यात आले व झाडा साठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्या यासाठी एकूण किती बजेट खर्च करण्यात आलेले आहे.व कोणत्या साइटवर बजेट वापरण्यात आल्या त्याची सविस्तर शासन नियमा नुसार माहिती देण्यात यावी.असे सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदना देता वेळी उपस्थित
ज्ञानेश्वर आडे प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष परतूर,
माऊली कदम प्रहार दिव्यांग उपाध्यक्ष परतूर
कुंडलिक राठोड शाखाध्यक्ष,
द्वारका गाडे‌ महिला जिल्हाध्यक्ष,
भानुदास आडे प्रहार सेवक, आदी ची उपस्थिती या वेळी होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत