लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

परतूर रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 - रेल्वे कर्मचारी व लॉयन्स क्लबच्या वतीने रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
      येथील स्थानिक रेल्वे विभाग व लॉयन्स क्लबच्या वतीने सोमवारी रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.संदीप चव्हाण,डॉ. नंद, स्टेशन प्रबंधक अमरदीप,पत्रकार राजकुमार भारुका,आरपीएफचे राजमल्ली, मेघराज पाटील, राजेश उबाळे, सुमित खालापूरे प्रा भोसलेसर गजानन तागडे शंकरसेठ अग्रवाल अशोक ठोके आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. संदीप चव्हाण यांनी म्हटले की, वृषारोपन ही काळाची गरज असून झाडे जगली तरच पर्यावरण टिकेल पर्यावरणच संतुलित जीवन आहे याची जाणीव सर्वांनी आत्मसाथ करणे ही काळाची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी रेल्वेस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत