सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिक्षकी पेशेत निष्ठने काम करा- रमाकांत बरीदे परतूर सेवानिवृतीनिमित्त सत्कार


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
     ता.३१(बातमीदार) शिक्षकी पेशात निष्ठतेने काम केल्यास चांगलेच फळ मिळते असे उदगार रविवार (ता. ३१) रोजी जिल्हा परिषद शाळेतून सेवा निवृत्त झालेले शिक्षक रमाकांत बरीदे यांनी आयोजित सेवा गौरव कार्यक्रमात केले. 
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रमोद कुमावत हे उपस्थित होते. या वेळेस पुढे बोलताना सेवानिवृत्त शिक्षक रमाकांत बरीदे म्हणाले की, मी माझ्या 30 वर्षाच्या नोकरीत खडू व फळा यात कधीच अंतर पडू दिले नाही. नवीन भरती झालेल्या शिक्षकांनी पण ही गोष्ट पाळलीच पाहिजे असे ते म्हणाले यावेळी म्हणाले, दरम्यान यावेळी मा.नगराध्यक्ष विनायक काळे,विजय राखे,राजेश कानपुडे, डॉ.संजय पुरी,लक्ष्मीकांत राऊत आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाला शंकरराव पवार,अंकुश बागल,अंकुश तेलगड,अखिल काजी,आरिफ आली, अँड.जगन्नाथ बागल,विष्णू कदम,विष्णू ढवळे, अशोक माने,लक्ष्मीकांत माने,प्रल्हाद माने,नंदलाल कपाळे, प्रभाकर बागल,सतीश गवळी,चंद्रकांत कपाळे, डॉ.गजानन केशरखाणे, डी. बी. काळे, ईश्वर दडमल,श्री पिंपळे,नितीन गवळी,सोनुभाऊ बरीदे,सुभाष बरीदे,महादेव बरीदे,मुकुंद शेपाल,राम रोहिणकर,रोहित कापळे,पांडुरंग कानपुडे,रामा माने,दीपक उबाळे,महारुद्र स्वामी,सतीश गुजर,शिवलिंग राऊत,दीपक मुजमुले आदी उपस्थित होते. 
                        कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण बागल यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती लंका सोनवणे यांनी केले तर आभार कृष्णा सोनवणे यांनी मानले
 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत