सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न



परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शहरासह ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास पाहता सण उत्सवाच्या काळात जातीय सलोखा अबाधित राहावा याकरिता परतूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 07 जुलै रोजी संध्याकाळी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
बकरी ईद व पंढरपूर आषाढी हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरा होणार असल्याने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे नागरिकांनी पालन करावे; तसेच सण उत्सव शांततेत साजरा करावे. या उद्देशाने शहरातील सर्वधर्मीय समुदायाला पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बोलावून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे,पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे,माजी उपनगराध्यक्ष सादेख खतीब,अजीज सौदागर,राहिमोद्दीन कुरेशी,सिद्धार्थ बंड, अंकुशराव तेलगड,अखिल काजी,शामसुंदर चित्तोडा,श्रीरंग जईद,सय्यद जुनेद,अय्युब कुरेशी,मौलाना अखिल,माणिक भाई कुरेशी,मौलाना काजी मुजफ्फर,हाजेफ अब्दुल रहेमान हाजेफ फय्याज,हाफेज जाबिर,गुप्तचर विभागाचे संजय वैद्य, यांच्यासह शहरातील अन्य नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत