सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त मंठा पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक संपन्न आषाढी एकादशी व ईद शांततेत साजरे करा - पो.निरीक्षक संजय देशमुख


मंठा - प्रतीनीधी सुभाष वायाळ
   मंठा पोलीस स्टेशन येथे शांतता समीतीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी बैठकीत बोलतांना पो.निरीक्षक श्री संजयजी देशमुख म्हणाले की येणारे सर्व सण उत्सव, ईद शांत्तेत साजरे करावे आषाडी एकादशी व बकरी ईद/ईदउल अजाह हे एकाच दिवशी येत असल्याने सणासुधीच्या वेळी सामाजिक सलोखा आबादीत राहो व कोणत्याहि समाजाचे अथवा व्याक्तिचे मन अथवा भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी अथवा खबरदारी घ्यावी.फेसबुक,व्हाॅटसॲप,टुवीटर,या सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ अथवा लिखाण असनारी पोस्ट टाकु नये,नसता कायदेशीर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन सर्व धर्मीय समुदायाला संबोधित करतांना श्री देशमुख बोलत होते.व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमाचे सर्वांनी पालन करावे असे ते म्हणाले मंठा शहरामध्ये सर्व सण उत्सव, ईद हे येथील सर्व समाज बांधव हे नेहमी एकञीतपणे मिळुन मिसळुन साजरे करतात हे मंठा शहरवासियांचे खास वैशिष्ट्ये आहे.मंठा शहरामध्ये आजपर्यंत कधीही कोणतेही सण असो अथवा उत्सव, ईद पण कधीच अनुचीत प्रकार घडला नाही आणी कधी घडणारही नाही असे शहरातील बैठकिस उपस्थीत प्रतिष्ठित नागरीक सांगत होते.यावेळी नगराध्यक्ष बालासाहेब बोराडे,उपनगराध्यक्ष जे के कुरैशी,माजी उपनगराध्यक्ष सीराजखान, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती बाज खान साहब, नगरसेवक अचीत नाना बोराडे, नगरसेवक उबेद बागवान, माजी नगरसेवक मुसाभाई कुरैशी,पञकार यांच्या सह शहरातील प्रतीष्टित नागरिक व पोलीस बांधवांची उपस्थीती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत