सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

2017 व 2018 मध्ये अहिल्याबाई सिंचन विहीर मंजूर करून शासनाची तीन लाख रुपयांची फसवणूक.... परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषण


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील मौजे वलखेड तालुका परतूर या ठिकाणी सिंचन विहिरीचा गट क्रमांक 61 मधील अहिल्याबाई सिंचन विहिरीचा प्रस्ताव सन 2017 व 2018 मध्ये मंजूर करून शासनाची तब्बल तीन लक्ष रुपयाची फसवणूक करून भ्रष्टाचार करण्यात आला आणि या भ्रष्टाचाराची योग्य दिशेने योग्य मार्गाने चौकशी होण्यासाठी गंगाधर विठ्ठलराव सुरुंग यांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती परतुर यांना निवेदन देण्यात आले होते.
        पण या निवेदनावरती कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वरिष्ठाकडे सुद्धा वेळोवेळी त्यांनी निवेदन पाठवले आणि पंचायत समितीने असे सांगितले की या कामाच्या संदर्भामध्ये संचिका ज्या आहेत त्या संचिका आमच्याकडे उपलब्ध नाहीत संचिका पूर्णच्या पूर्ण गहाळ करण्याचे काम येथील अधिकाऱ्यांनी केले होते. याची योग्य चौकशी करून कारवाई करण्याच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा विठ्ठल गंगाधरराव सुरुंग यांनी घेतलेला आहे. जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने उचललेले विहिरीचे बिल शासनात परत केल्या जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत