लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

2017 व 2018 मध्ये अहिल्याबाई सिंचन विहीर मंजूर करून शासनाची तीन लाख रुपयांची फसवणूक.... परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषण


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील मौजे वलखेड तालुका परतूर या ठिकाणी सिंचन विहिरीचा गट क्रमांक 61 मधील अहिल्याबाई सिंचन विहिरीचा प्रस्ताव सन 2017 व 2018 मध्ये मंजूर करून शासनाची तब्बल तीन लक्ष रुपयाची फसवणूक करून भ्रष्टाचार करण्यात आला आणि या भ्रष्टाचाराची योग्य दिशेने योग्य मार्गाने चौकशी होण्यासाठी गंगाधर विठ्ठलराव सुरुंग यांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती परतुर यांना निवेदन देण्यात आले होते.
        पण या निवेदनावरती कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वरिष्ठाकडे सुद्धा वेळोवेळी त्यांनी निवेदन पाठवले आणि पंचायत समितीने असे सांगितले की या कामाच्या संदर्भामध्ये संचिका ज्या आहेत त्या संचिका आमच्याकडे उपलब्ध नाहीत संचिका पूर्णच्या पूर्ण गहाळ करण्याचे काम येथील अधिकाऱ्यांनी केले होते. याची योग्य चौकशी करून कारवाई करण्याच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा विठ्ठल गंगाधरराव सुरुंग यांनी घेतलेला आहे. जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने उचललेले विहिरीचे बिल शासनात परत केल्या जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत