सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रम संपन्न


मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ
     दि. 11 रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय,मंठा येथे हरघर तिरंगा अंतर्गत पोलीस प्रशासन मंठा व स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम ट्रॅफिक रुल व सोशल मीडिया वापराबाबत जनजागृती अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव हे होते.
या कार्यक्रमाला उपस्थित प्रशिक्षणार्थी पी.एस.आय दिपाली शिंदे मॅडम पी.एस.आय राऊत, साहेब पो. कॉ. श्री आढे पी.एस.आय श्री शिंदे साहेब पो. कॉ. प्रशांत काळे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात दीप प्रज्वलानंतर राखी पौर्णिमेनिमित्त झाडाला राखी बांधून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उप.प्राचार्य संभाजी तिडके यांनी केले . या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी पी एस आय दिपाली शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. व विविध संधीची माहिती सांगितली. तसेच पो. कॉ. प्रशांत काळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व मोबाईल वापर संबंधी विविध गुन्ह्याबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना पुढील करिअर साठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पी एस आय श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅफिक रुल समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुधाकर जाधव यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि देशाचे भविष्य घडवण्याचे कार्य आमच्या हाती आहे,याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.पाटील मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. संदेश राठोड यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.शेळके सर प्रा. सौ.देशमुख मॅडम प्रा. आर के शिंदे प्रा. पंढरीनाथ काकडे यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत