सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथील विद्यार्थ्यांनी साकारल्या गणरायांच्या आकर्षक मूर्ती.....

  परतूर प्रतीनिधी हनुमंत दवंडे 
   तालुक्यातील यश प्रायमरी इंग्लिश स्कूल तसेच यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सातोना खुर्द या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी चिखलापासून गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्ती बनवण्याचे आठवडाभर प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी स्वतः मूर्ती तयार करण्यासाठी प्रयत्न करावा तसेच याच स्वनिर्मित मूर्तीचीच आपल्या घरी व शाळेत स्थापना करावी अशी संकल्पना संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष बालासाहेब सितारामजी आकात यांची होती. मुख्याध्यापक जयराम खंदारे , अनिल बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेत वर्ग पहिली ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आकर्षक अशा मूर्ती साकारल्या.  
   सर्व विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली व सोप्या पद्धतीने चिखलापासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण सर्व शिक्षकांनी दिले. यासाठी पालकांनीही मोलाचे सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरज दूधगोंडे , दीपा सावंत व भावना पाटिल ,सरिता गायकवाड , ज्योती बिडवे , महादेव गायकवाड़,गणेश गोरे, तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत