सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

आकणी विविध विकास सहकारी सोसायटीवर भाजपाचा ताबा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा उडवला धुव्वा,सर्वच्या सर्व 12 उमेदवारांचे निर्विवाद वर्चस्व

मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
      आकणी विविध विकास सहकारी सोसायटी निवडणूक 2022 चे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले असून अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व बारा उमेदवार निर्विवाद वर्चस्व स्थापित केली आहे.
माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या उमेदवारांनी आकणी विविध विकास सहकारी सोसायटी निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा ध्रुवा उडवत भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून यासंदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिस्पर्ध्यांनी प्रतिष्ठेची केली असताना सर्वच्या सर्व बारा जागांवर विरोधकांना आसमान दाखवले भाजपा पुरस्कृत पॅनलचे विजयी उमेदवार खणके त्रिंबक भाऊराव,खणके दशरथ तुकाराम,जाधव गुलाब आमृता,नरोटे त्रिंबक दादाराव,पोले पांडुरंग गोपाळराव,मोरे रतन रामभाऊ,मोरे संपत सोमा,राठोड पांडुरंग रेखा, ,कदम अरुणा बालासाहेब,मोरे सत्यशिला विठ्ठलराव,चव्हाण बाबु वाघु,अंभुरे सखाराम गोविंद यांनी प्रचंड मताधिक्य आणि विजय मिळवल्याबद्दल माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत