सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

वाई येथे जनावराचे मोफत लसीकरण

मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
  वाई ग्रामपंचायत च्या वतीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लंपी साथरोग प्रतिबंधक लस देण्यात आली या मोहिमेचा समारंभ वाई गावचे सरपंच परमेश्वर उबाळे तसेच उपसरपंच सुनील दत्तात्रय ठाकरे तसेच गावचे मानकरी नारायण पाटील उबाळे यावेळी हजर होते
     सुमारे चारशे ते साडेचारशे जनावरांना या मोहिमेअंतर्गत लस देण्यात आली वाई गावातील नागरिक शेतीसह मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करतात सद्यस्थितीला लंबी हा सात रोग झपाट्याने वाढत असल्याने शेतकरी व पशुधन पालक चिंतेत आहेत शासनाकडून लपी प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने सरपंच परमेश्वर उबाळे तसेच पत्रकार रामेश्वर उबाळे यांनी पुढाकार घेऊन खाजगी लस उपलब्ध करून दिली.
त्यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण सर तसेच डॉक्टर मानमोडे सर तसेच त्यांची पूर्ण टीम वाई गावात दाखल झाली तसेच सरपंच यांनी जनजागृती करताना शेतकऱ्यांनी जनावरांचे गोटे फवारून घ्यावे लिंबाचा पाला दिवस माळवतेच्या वेळी लिंबाच्या पानाचा धूर करावा असे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत