सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वरफळकरांच्या आंदोलनाने विजवीतरण कार्यालय दणाणले.....उपकार्यकारी अभियंता यांच्या अश्वासनाने आंदोलन मागे



परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
ग्रामीण भागातील वीजपुरवठा विस्कळीत अनेक वेळा विद्युत वितरण कंपनी च्या निष्काळजीपणा मुळे झालेला असल्याच्या अनेक तक्रारी तालुक्यात असतांना मौजे वरफळ येथील सिंगल फेज योजनेचे रोहित्र वेळोवेळी जळत आहे याबाबत गावकऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या निदर्शनास आणून दिले असता विद्युत विभागाकडून अत्यंत खराब दर्ज्याचे रोहित्र दुरुस्त करून आणून दिलेले असल्याचा आरोप करत नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला
याबाबत गावकरी यांचे म्हणणे आहे की मागील अनेक वर्षापासून विजेच्या समस्या बाबत कायमचा तोडगा निघत नसल्याने स्थानिक गावकरी लोकवर्गणी जमा करून गावातील जळालेले रोहित दुरुस्त करून आणतात व रोहितरावर झालेल्या बिघाडा चा खर्च सुद्धा गावकरी आपल्या माध्यमातून करतात परंतु जळालेले रोहित्र दुरुस्तीच्या नावाखाली अत्यंत खराब दर्जाचे व त्यातील आई हे पूर्णतः काळे असतात त्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महिना महिना दोन दोन महिने घरगुती वीज पुरवठा मिळत नाही तरीही विद्युत वितरण विभागाकडून विजेचे बिल देण्यात येतात यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता निलेश भेंडाळे यांचे कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केलं जवळपास हे आंदोलन दोन तास चाललं त्यानंतर श्री निलेश भेंडाळे यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून अविश्वासीत केले की येणाऱ्या 1 तारखे पर्यंत गावातील विजेच्या पूर्ण समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे तर तत्काळ रोहित्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत