सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथे सोमावारी कविसंमेलन


  मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
     दि.०९ मंठा येथील आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उद्या १० ऑक्टो. रोजी, सायंकाळी ठीक ६:३० वा मंठा येथे "पौर्णिमा कवितेची" या शीर्षकांतर्गत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
     जि. प.प्रशालेच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आ.राजेशभैया राठोड यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मा.ए.जे.बोराडे पाटील यांची उपस्थिती असेल, तर विशेष अतिथी म्हणून भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र सचिव मा.राजेश मोरे व अ.भा.सा. सोशल फाऊंडेशनचे संचालक मा.डॉ.प्रवीण माळेगावकर हे उपस्थित राहणार आहेत.
     या कविसंमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत,अकोला, निलेश चव्हाण औरंगाबाद, अविनाश भारती परळी, धम्मपाल जाधव,औरंगाबाद यांच्या बहारदार काव्याची मेजवानी उपस्थित रसिकांना मिळणार आहे.
    याच कार्यक्रमात मंडळाचे वयोवृद्ध सक्रिय सभासद प्राचार्य कु.पि.इंगळे व श्री हरिराम तिवारी ( बाबुजी ) यांचा "जीवनगौरव पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कविसंमेलनास मंठा,सेलू, परतूर, वाटूर व मंठा शहरासह तालुक्यातील काव्यरसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आविष्कार साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ.धोंडोपंत मानवतकर, डॉ.संतोष मोरे, प्रा.डॉ, सदाशिव कमळकर, श्री पी.टी. प्रधान, सौ.शोभा डहाळे, प्रा.प्रदीप देशमुख, शिवाजी जाधव, ओमप्रकाश राठोड, सौ.मंजूषा काळे,प्रदीप इक्कर, विजय गायकवाड व शत्रुघ्न तळेकर आदींनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत