लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

उद्या निघणाऱ्या मशाल यात्रेस हजारों च्या संख्याने उपस्थित रहा -राहुल कदम

  परतूर प्रतीनीधी हनुमंत दवंडे 
     शिवसेनेतील गद्दारानी फूटून शिवसेनेच्या धनुष्य बाणावर आपला हक्क सांगितला होता परंतु खरा हक्क हिन्दू हृदय सम्राट माननीय बालासाहेब ठाकरे यांचे वारसदार माननीय उद्योग साहेब ठाकरे यांचा होता परंतु गद्दारानी यांच्या वर हक्क सांगीतल्या मुळे नुकतेच निवडणूक आयोगाने शिवसेनाचे आसणारे निवडणूक चिन्ह धनूष्य बाण हे गोठवले आहे 
    आरे निवडणूक चिन्ह गोठवले म्हणून तर रक्त आमचे पेटवले
       तरी मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगा समोर *पेटती मशाल* या चिन्हाची मागणी केली होती या चिन्हाची या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली असून हे निवडणूक चिन्ह प्रत्येक मतदाराच्या घराघरात नाही तर मनामनात पोहोचवण्याकरिता उद्या दिनांक 13 रोजी रेल्वे गेट परतुर येथून संध्याकाळी सहा वाजता *पेटती मशाल* यात्रेचे आयोजन केलेले आहे
    तरी महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ही मशाल प्रत्येक मतदाराच्या मनामनात पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे 
    

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत