आनंदवाडी ,रायपुर, शिरसगाव या शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या सोलार पॅनलचे अतोनात नुकसान.


परतुर प्रतिनिधी हनुमान दवंडे
परतुर तालुक्यातील आनंदवाडी, शिरसगाव ,रायपुर या शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले आहे. 
      अशी तक्रार शेतकरी विठ्ठल सुदाम सावंत यांन सांगितले आहे. याशिवारातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये बसवलेला सोलार शक्ती या कंपनीचा 3 एचपी चा सोलर बसवलेला होता अचानक मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व वादळ वारा आला आणि सोलार पंपाचे होत्याचे नव्हते झाले. मोडून तोडून पडलेल्या अवस्थेत त्याची दुर्दशा झालेली आहे त्यामुळे विठ्ठल सावंत या शेतकऱ्यांनी दैनिक परतवाडा टाइम्सशी बोलताना हळहळ व्यक्त केली आहे... तसेच तीन एचपी सोलर हा शक्ती पंप कंपनीचा आहे तरी ह्या कंपनीने माझे झालेले नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तक्रारी अर्जद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात