लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

आनंदवाडी ,रायपुर, शिरसगाव या शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या सोलार पॅनलचे अतोनात नुकसान.


परतुर प्रतिनिधी हनुमान दवंडे
परतुर तालुक्यातील आनंदवाडी, शिरसगाव ,रायपुर या शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झाले आहे. 
      अशी तक्रार शेतकरी विठ्ठल सुदाम सावंत यांन सांगितले आहे. याशिवारातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये बसवलेला सोलार शक्ती या कंपनीचा 3 एचपी चा सोलर बसवलेला होता अचानक मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व वादळ वारा आला आणि सोलार पंपाचे होत्याचे नव्हते झाले. मोडून तोडून पडलेल्या अवस्थेत त्याची दुर्दशा झालेली आहे त्यामुळे विठ्ठल सावंत या शेतकऱ्यांनी दैनिक परतवाडा टाइम्सशी बोलताना हळहळ व्यक्त केली आहे... तसेच तीन एचपी सोलर हा शक्ती पंप कंपनीचा आहे तरी ह्या कंपनीने माझे झालेले नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी तक्रारी अर्जद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत