सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

यश ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट येथे बाल दिन उत्साहात साजरा

 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
     तालुक्यातील सातोना येथील यश प्रायमरी इंग्लिश स्कूल तसेच यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सातोना येथे आज पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
     चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक शामीर शेख तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बहुरूपी कैलास शिंदे व भारत शिंदे, विलास गोरे यांची उपस्थिती होती. यावेळी शामीर शेख, जयराम खंदारे यांनी चिमुकल्यांना मोलाचे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.तसेच बहुरूपीनी सुद्धा आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरपूर हसवले. मुलांनीही चाचा नेहरूविषयी मनोगत व्यक्त केली.
  दरम्यान विविध पशु पक्ष्याच्या वेशभूशेत आलेल्या विद्यार्थ्यांनी बालमित्रांना संगीताच्या जोमात मनसोक्त आनंद दिला. यावेळी येथील शिक्षकांनी विविध खेळांचे आयोजनही केले होते.अनेक मुलांनी प्राण्यांची आवाज काढली. कोणी गाणी म्हणली. यात शिक्षकांनीही जणु बालपणात जाऊन बालगोपालसोबत आस्वाद घेतला.यावेळी मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश गोरे यांनी तर आभार अश्विनी कोळपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपा सावंत, राधिका आकात, सीमा पवार, महादेव गायकवाड,मंजुषा बोराडे, मालन सु्रोडकर, निलेश यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत