सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिवसेना परतुर तालुका प्रमुखपदी सुदर्शन सोळंके यांची निवड

परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
         येथील शिवसेनेचे जुने कार्यकर्ते सुदर्शन बप्पा सोळंके यांची शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी निवड घोषित करण्यात आली. पूर्वीचे तालुकाप्रमुख अशोक आघाव यांना पद उन्नती देत मंठा, परतूर तालुका समनवयक म्हणून निवडण्यात आली. शिवसेना भवन मुबई येथून सदरील निवडी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी पत्रकारांना दिली. यानिवडीबद्दल त्यांचे शिवसेनेचे जेष्ठ नेते रामेश्वर अण्णा नळगे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड ,उपतालुका प्रमुख रामचंद्र काळे, संजय गोंडगे, शिव वाहतूक संघटना तालुकाध्यक्ष रामजी अण्णा सोळंके 
शहरप्रमुख विदूर जैद , युवानेते गजु भाऊ चौडे, रामजी खवल, अशोक काका सोळंके , संतोष ठोंबरे भास्कर तात्या सोळंके , दुष्यंत ठोंबरे, बाळू गाते, सुदाम कदम, प्रमोद सोळंके, प्रभाकर सोळंके, गजानन सोळंके यांच्या प्रमुख उपस्तीतीत स्वागत करण्यात आले. दरम्यान या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, जिल्ह्यात शिवसेनेची नवी कार्यकारणी घोषित करण्यात आली असून, यात सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून सन्मान देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. शिवसेनेचे द्येय धोरणे सर्वांपर्यंत पोहचावा व उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहत, शिवसेनेचा झंझावत नव्यानं निर्माण करा असे आहवन त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत