धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

शिवसेना परतुर तालुका प्रमुखपदी सुदर्शन सोळंके यांची निवड

परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
         येथील शिवसेनेचे जुने कार्यकर्ते सुदर्शन बप्पा सोळंके यांची शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी निवड घोषित करण्यात आली. पूर्वीचे तालुकाप्रमुख अशोक आघाव यांना पद उन्नती देत मंठा, परतूर तालुका समनवयक म्हणून निवडण्यात आली. शिवसेना भवन मुबई येथून सदरील निवडी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी पत्रकारांना दिली. यानिवडीबद्दल त्यांचे शिवसेनेचे जेष्ठ नेते रामेश्वर अण्णा नळगे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड ,उपतालुका प्रमुख रामचंद्र काळे, संजय गोंडगे, शिव वाहतूक संघटना तालुकाध्यक्ष रामजी अण्णा सोळंके 
शहरप्रमुख विदूर जैद , युवानेते गजु भाऊ चौडे, रामजी खवल, अशोक काका सोळंके , संतोष ठोंबरे भास्कर तात्या सोळंके , दुष्यंत ठोंबरे, बाळू गाते, सुदाम कदम, प्रमोद सोळंके, प्रभाकर सोळंके, गजानन सोळंके यांच्या प्रमुख उपस्तीतीत स्वागत करण्यात आले. दरम्यान या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, जिल्ह्यात शिवसेनेची नवी कार्यकारणी घोषित करण्यात आली असून, यात सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून सन्मान देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. शिवसेनेचे द्येय धोरणे सर्वांपर्यंत पोहचावा व उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहत, शिवसेनेचा झंझावत नव्यानं निर्माण करा असे आहवन त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत