सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांच्या मागणीला यश-अशोक तनपुरे

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
भारतात प्रथम महाराष्ट्रात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना दिव्यांगाच्या कल्याणासाठी व इतर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी मंत्रालयामध्ये दिव्यांगासाठी माजी राज्यमंत्री बच्चु कडू गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे
      यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांनी विविध प्रकारचे आंदोलने मोर्चा उपोषण केले  मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्या असून जागतिक अपंग दिनाच्या दिवशी 3 डिसेंबर रोजी स्थापन होणार आहे अशी माहिती माझी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना माहिती दिली याबद्दल दिव्यांग्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चु कडू यांचे दिव्यांगाच्या वतीने आभार मानले व आनंद व्यक्त केला आसल्याचे अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी दिलेल्या एका पत्रकामध्ये म्हटले आहे

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात