सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर शहरातील शाळेसमोरील भाजीपाला बिटमुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
     शहरातील बसस्थानक रोडवरील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयासमोर दररोज सकाळी भरणाऱ्या भाजीपाला बिटमुळे मोठा गोंगाट होत असून विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे बिट इतरत्र हलविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
     शहरातील गाव भागात बसस्थानक रस्त्यावर लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालय आहे.शहरासह ग्रामीण भागातील शेकडो मुली या विद्यालयात शिक्षणासाठी बसने ये-जा करतात.बसस्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे विद्यालय असल्याने ग्रामीण भागातील मुली या विद्यालयात प्राधान्याने प्रवेश घेतात.परंतु विद्यालयासमोरच दररोज सकाळी भाजीपाल्याच्या ठोक विक्रीचे बिट भरते.बिटामध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी शहरासह आजूबाजूच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने येतात तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी लहान-मोठे भाजीपाला विक्रेते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात.भाजीपाला वाहून नेण्यासाठी दुचाकी,सायकलरिक्षा,हातगाडी किंवा इतर वाहनांचा वावर येथे मोठ्या प्रमाणात असतो.त्यामुळे एकच गर्दी होते. ही गर्दी शाळेसमोरच होत असल्याने शिक्षकांना ज्ञानदानाचे कार्य करण्यात मोठी अडचण येत आहे. परिणामी शाळेच्या कामकाजात बाधा होत आहे.विद्यार्थिनींचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. बिटातील गोंगाटाचा आवाज थेट वर्गात जात असल्याने विद्यार्थिनी व शिक्षकांना अतोनात त्रासाला सामोरे जावे लागते आहे.विद्यालयापासून हाकेच्या अंतरावर नगरपरिषद कार्यालय आहे हे विशेष.
-----------------------------
उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव,तहसीलदार रूपा चित्रक व पालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी स्वतः लक्ष घालून शाळेसमोरील बिट इतरत्र हलवावे जेणे करून विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी केली जात आहे.दरम्यान, बिट इतरत्र हलविण्याबाबत वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत