सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

बहु आवडेसी जीवापासोनीया कानडीया विठोबा कानडीया वीसी हभप-सोमनाथ महाराज कऱ्हाळे

तळणी प्रतिनिधी रवी पाटिल
     तळणी येथील अंखड हरीनाम सप्ताहात आज पहील्या दिवशीचे किर्तन पूष्प ह भ प सोमनाथ महाराज कऱ्हाळे यानी गुंफले 
   संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय याच्या बहु आवडेसी जीवापासोनीया कानडीया विठोबा कानडीया या अभंगावर चितंन केले या निरुपणा मध्ये विश्ववंदनीय ज्ञानेश्वर महाराज देवाचे महत्व विषद करतात मला देव आवडला पण तो किती आवडला आवडची पराकाष्टा करणारे ज्ञानोबाराय सांगतात देवा तुझी शपथ घेऊन सागतो तुझी आण वाहीन गा पण देवा तु मला किती आवडतो तर बहु आवडीसी जीवा पासोनीया 
प्रत्येकाला ज्याचे त्याचे शरीर प्रिय असते शरीरावर प्रेम करणारी आपण मानसे आहोत शरीराची ठेवण व्यवस्थीत ठेवण्यासाठी आज कालचा तरुण किती तरी तास सलून मध्ये व्यर्थ घालवत आहे मनुष्याला शरीरापेक्षा जीव महत्वाचा वाटतो पण हीच गोष्ट संतांच्या बाबतीत होत नाही खास करुन ज्ञानोबारांय म्हणतात पांडूरगा मला जीवापेक्षा तु महत्वाचा आहे तु मला जास्त आवडतो जीवीचीया जीवा प्रेमभावाचीया भावा तुज वाचुनी केशवा आनु ना आवडे
   मनुष्याला देव आवडण्या आधी देव मान्य असावा लागतो मान्य असणारा देव समजावा लागतो व समजलेला देव भेटावा लागतो मग त्याच्या विषयी आवड निर्माण होते देवा विषयी आवड निर्माण होणे म्हणजे भक्ती संप्रदायातील अतिऊच्छ अवस्था आहे आजच्या या वर्तमान काळामध्ये मनुष्याला काय आवडावे हे सागता येत नाही पण देवाविषयी आवड निर्माण होत असेल तर असे समजावे की मनुष्याची परमार्थीक साधना योग्य दिशेन चालू आहे सप्ताह मध्ये अठरापगड जातीचे लोक या धर्म मंडपामध्ये येतात त्या भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली येतात ही खरी ताकद वारकरी सप्रंदायाची आहे या धर्म मंडपामध्ये मनुष्याला ऊर्जा मिळते संसारीक अध्यात्मिक वाटचाली साठी ती उर्जा कामी येते 
    आज काल मनुष्या मोठया प्रमाणात पैसा आहे पैश्याच्या जोरावर मनुष्य चंद्रांवर जाऊ शकेल पण त्याला खरा अध्यात्मीक आंनद मिळवायचा असेल तर त्याला या सप्ताहच्या धर्म मंडपामध्येच यावे लागेल तो इतर कुठेही मिळणार नाही मनुष्याच्या आनंदासाठी समाधानासाठी जर हा धर्ममंडप सज्ज होत असेल तर प्रत्येकाने येथे यायला हरकत काय आहे सप्ताह मध्ये कुठलीही सेवा करण्यासाठी तत्परता असणे गरजेचे आहे 
   सप्ताह मध्ये विणेकराची भूमिका फार महत्वाची आहे विण्याची सेवा ही चोवीस तासाची सेवा आहे ती तरुणानी केली पाहीजी ती सेवा विणा कारण वाया जाणार नाही 
  मनुष्याने इश्वराला समर्पन केले पाहीजे ज्ञानोबा तुकोबाचे जीवन हे समाजासाठी धर्मासाठी समर्पक जीवन होते म्हणून त्याना देवत्व प्रात्त झाले त्यानी दाखवलेला भक्ती मार्ग मनुष्याच्या उध्दाराचा मार्ग आहे तो तुम्ही आम्ही स्वीकारला पाहीजे सात दिवसाच्या सप्ताह पूरती आपली भक्ती उतू येऊ देऊ नये तिच्यात सात्यत राहीले तर मनुष्याचा उद्धार झाल्याशिवा राहणार नाही असे महाराजानी शेवटी सांगीतले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत