सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पक्ष बांधनीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कंबर कसुन कामाला लागावे -जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर


रिपब्लिकन सेनेची पक्ष कार्यालयात बैठक संपन्न
जालना (प्रतिनिधी) समाधान खरात 
    सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि आगामी काळातील निवडणुकांच्या पुर्वतयारीसाठी महाराष्ट्र अध्यक्ष सागर डबरासे यांच्या सुचनेवरून जालना जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वतीने शुक्रवार दि. 17 मार्च रोजी पक्ष कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी पु. जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, महासचिव एक्स आर्मी चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्रआप्पा खरात, सिध्दार्थ पानवाले, महिला अध्यक्षा कांताबाई बोरूडे, युवक आघाडी अध्याक्षा पिया जैन, सर्जेराव आंभुरे, समाधान खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीमध्ये बोलतांना वाहुळकर म्हणाले की, काल झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरबरा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच परभणी येथे होणारा रिपब्लिकन सेनेचा स्वाभीमानी मेळावा दि. 25 मार्च रोजी होणार असून जालना जिल्ह्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. आगामी जि. प., पं. स., न. प. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधनीच्या कामाला कंबर कसुन लागावे आणि गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता असे ध्येय पदाधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावे असे देखील त्यांनी यावेळी सांगीतले.
    यावेळी जिल्हा सचिव नवनाथ ठोके, जालना तालुकाध्यक्ष भिमराज खरात, अंबड तालुकाध्यक्ष गोरख आपुट, बदनापुर तालुकाध्यक्ष दादू गरबडे, परतुर तालुकाध्यक्ष जयपाल भालके, सोमाजी लहाने, मधुकर मस्के, शेख जब्बार, अनिल भालमोडे, जालना शहराध्यक्ष माया खिल्लारे, युवक जालना तालुका अध्यक्ष दिनेश वाहुळे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्के, बाळू गरबडे, संजय गरबडे, दादाभाऊ भालमोडे, प्रकाश हिवाळे, कैलास लहाने, कैलास भालके, वैभव खरात, अर्जुन म्हस्के, पंडित मस्के, इंदुबाई लहाने, शोभाबाई मस्के, गजानन भालमोडे, शांताबाई हिवाळे, चत्रभूज भालमोडे, संदीप उबाळे, बबनराव खरात, अशोक पवार, कारभारी आपुट, राहुल खरात आदींसह पदाधिकाऱ्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी रिपब्लिकन सेने वंचित आघाडी युतीचे नंदापूर येथील सरपंच दत्ता कुरधने आणि उपसरपंच रामदास खरात, सदस्य पुनम रविंद्र खरात, पानेगाव येथील ग्रा. प. सदस्य शाहूराव आपुट, सोसायटी सदस्य गोरख आपुट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत