न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

पोहरागड (पोहरादेवी) येथे बंजारा जनजागृती महा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा - अर्जून नायक

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथे दि. २९ मार्च रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती महा मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंतांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले आहे, तरी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेड मराठवाडा संघटक अर्जुन नायक यांनी केले आहे. 
     या जनजागृती महा मेळाव्याला धर्मगुरु बाबुसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, महंत सुनिल महाराज, महंत रमेश महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज, देवी - बापू भक्त महंत शेखर महाराज, महंत खुशाल महाराज यांच्यासह भारतभरातून येणाऱ्या संत महंत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महामेळाव्याला बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत. 
        मागील अनेक वर्षापासून देश पातळीवरील अनेक समस्यांना बंजारा समाज तोंड देत असून त्याकडे कोणतेही शासन प्रशासन लक्ष द्यायला नसल्याने आता देशपातळीवर सामाजिक एकजुटीचा निर्णय घेण्याची वेळ आलेली असल्याने, भारतातील 15 ते 20 बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी असलेल्या पोहरादेवी (पोहरागड) येथे राष्ट्रव्यापी अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून या ठिकाणी 13 ते 14 राज्यातील लोकांची उपस्थिती राहणार आहे, तरी या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने महा मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा ब्रिगेडचे मराठवाडा संघटक अर्जुन नायक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत