सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिक्षण शिकवणी मुळे मुलांचे मैदानी खेळाचे भविष्य अंधारात - संतोष शर्मा

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
सध्या पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा उत्तम निर्णय आहे, 
पण तो निर्णय आपल्या मुलांच्या भविष्यात चांगले ठरेल का!
कारण गेल्या  दहा वर्षात ज्या शिक्षक सरांची लायकी नाही .
ते आज लाखों ने कमाई करत आहे त्या मध्ये भर पड़ली उच्च शिक्षण म्हणजेच - इंग्लिश शाळे ची ते म्हणजे दोघात मिळून झालेली साठ-गाठ ....
ह्या सर्व प्रकारा मुळे मुलांना उन्हाळयात पडणारी सुट्टी वर पडली तलवार त्यांना माघीलं दहा महीण्यात न मिळालेला 
खेळासाठी वेळ, मी म्हणत नाही कि फक्त मुलांनी क्रिकेट च खेळावें !
नाही तर खुप प्रकारचे मैदानी खेळ आहे त्यात बॅटमिटन , रणींग फुटबाल, हॉकी, कब्बडी, खो-खो आसे खूप प्रकारचे खेळ आहे
पालंकानी आपल्या मुलांवर आलेला बर्डन ( ताण) कमी करावा .
व आपल्या मुला सोबत एक मित्रा ची भूमिका घेऊन त्यांच्या भावना स्वतः पालकांनी जाणून घेणे गरजेचे आहे
आपल्या मुलाना ह्या बारा महिन्यातून मिळालेला दोन महिण्याचा सुवर्ण काळ स्वत आपल्या मुलाला विचारून मुलाना मन मोकळे खेळ खेळु दयावे , 
त्यांच्या पसंतीचे सुट्टी चे हे दोन महिने आपल्या पद्धतीने व्यतीत करू दयावे 
खेळाचे महत्व म्हणजे मुलात येणारा बदल जास्तीत जास्त नव -नवीन होणारे त्यांचे मित्र व नवीन काही शिकण्याचे धेय
असं माझ मत आहे आता जवळ पास आपले जूने खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे
आपण पलक समझदार आहे. मी फक्त इथं माझ्या भावना व्यक्ती केल्या
कारण आपल्या तालुका स्तरावर पण खुप प्रतिभाशाली खेळाडू आहे पण त्यांना जिल्हा स्तरावर स्वार्था पोटी नजर अंदाज केले जाते 
म्हणुन मी ट्युशन घेणाऱ्या निजी शाळाच्या संस्था चालकाला
 विनती करतो कि मुलाना खेळायचा वेळ द्या 
जेणे करून विद्यार्थी चा मानसिक क्षमतेचा विकास होईल व विद्यार्थी हा विद्यार्थी न होता त्याचा थोड़ा कल खेळा कडे वळेल त्यातूनच भविष्यात एक नवीन विद्यार्थी किवा खेळाडू घडेल
शर्मा बहुउद्देशीय सेवा भावी संस्था परतूर 
शर्मा क्रिकेट अकडमी परतूर

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत